March 19, 2018

अभिमन्यु आणि अशे अनेक


अनेक ट्रॅप्स आपल्या भोवती असतात .. त्यात आपण कळत नकळत अडकतो .. असाच एक ट्रॅप , स्पर्धा परीक्षांचं .. त्याबद्दल .

============================================================================

अभिमन्यु 

सुभद्रा - अर्जुनाचा मुलगा , उत्तरेचा नवरा आणि कृष्णाचा भाचा याहीपेक्षा जास्त आपण अभिमन्युला ओळखतो ते महाभारतातील चक्रव्युव्हामुळे .   

           ज्या युद्धभूमीवर अर्जुन , कर्ण , भीम , द्रोण , दुर्योधन यांच्यासारखे रथी - महारथी आपली शौर्य गाथा लिहीत होते त्या युद्धभूमीवर आपल्या पराक्रमाचा ठसा उमटण्याची संधी अभिमन्यूला भेटली होती . इतिहास घडवण्यासाठीच अभिमन्युने चक्रव्युव्हात प्रवेश केला असणार. चिंतेचा पुसटसाही स्पर्श त्याला झाला नसणार . चिंतेऐवजी त्याला विजयश्री दिसली असणार . इतिहासात न पुसले जाणारे नाव कोरलेले त्याला दिसले असणार . यानेच तो नकळत आंधळा झाला असणार . दुर्दम्य आशावाद हाच त्याच्या वीर (हकनाक) बळीचे कारण असणार. मरणातही तो अमर झाला . पराभवातही  इतिहासात त्याचे नाव कोरले गेले हे खरे . सर्व अभिमन्यू हे तितके सुदैवी नसतात .   

          अर्धवट ज्ञान , अपुरी तयारी , अतिआत्मविश्वास अथवा नियतीचा करार , कारण काहीही असो . धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर एक अभिमन्यु हकनाक बळी पडला . कदाचित त्याचा खून च झाला . असे कितीतरी अभिमन्यु स्पर्धापरीक्षा -upsc च्या चक्रव्युव्हात अडकले असतील ; कधीच बाहेर न पडण्यासाठी . 

No comments:

Post a Comment

Featured post

सो ऽहम्

कोहम  याचे उत्तर सोहम असे असेल तर .. मग तो    सोहम काय , तर तो असा 

Popular हि काही